संजीवनी युवा प्रतिष्ठान
युवकांच्या ताकदीतून समाजासाठी काम करण्याचा संकल्प
२०१५ मध्ये मा. विवेक बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली संजीवनी युवा प्रतिष्ठान ही समाजासाठी काम करणारी युवकांची संस्था आहे.
कोपरगावातून सुरू झालेला हा प्रवास आज १४०० हून अधिक सक्रिय सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. युवक, पर्यावरण, शेती, आरोग्य आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवत समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
आमचा उद्देश
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास, मदत आणि संधी पोहोचवणे, तसेच युवकांना समाजकार्यात सहभागी करून जबाबदार नागरिक घडवणे.
आमचे ध्येय
युवकांना समाजकार्यासाठी प्रेरित करून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती आणि समाजकल्याण या क्षेत्रांमध्ये अर्थपूर्ण बदल घडवणे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा, संधी आणि मदत पोहोचवून अधिक सक्षम, स्वावलंबी आणि संवेदनशील समाज घडवणे.

